News not found!

मुलांचा विकास

आनंदाचे डोही आनंद तरंग

आमची सई, मे महिन्यात ३ वर्षांची झाली आणि आम्ही तिला बालभवनच्या महिनाभराच्या उन्हाळी शिबिरात घातलं. रस्त्याने येता – जाता गरवारे बालभवनच्या मैदानावर खेळणारी छोटी छोटी मुलं दिसायची, तेवढीच माझी बालभवनशी ‘तोंड ओळख’ होती. सई आधी सुट्टीत अणि मग जूनपासून रोजच बालभवनला जाऊ लागली. तिला नेता – आणता, मीही बालभवनमध्ये रुळायला अन रेंगाळायला लागले. काही दिवसांत माझ्याही नकळत बालभवन कुटुंबाचीच झाले.

मुलांच्या वर्तनसमस्या आणि बालभवन !

'लहानपण देगा देवा' असे वाक्य मोठ्या आशेने म्हणणाऱ्या मोठ्यांना आपल्या लहानग्यांचा हेवा वाटत असतो. पण कधी कधी लहान मुलांच्या वागण्याने हैराण झाल्यामुळे वैतागही वाटतो. हट्टीपणा, आक्रस्ताळेपणा, विचित्र सवयी, टीव्ही-मोबाईलचे वेड, आरडाओरडा, मारामाऱ्या, या आणि अश्या अनेक वर्तनसमस्या आणि त्यातून उद्भवणारे नाना प्रश्न सोडवताना पालकांच्या अगदी नाकी नऊ येतात. सगळ्या सोयीसुविधा पुरवूनही ही मुले अशी का वागतात, हेच आई -बाबांना समजत नाही.
खरेच, 'मुले अशी का वागतात?' या प्रश्नाचे एकच अचूक उत्तर नसून अनेक उत्तरे आहेत! (की शक्यता म्हणावे ??)

आम्ही मिळवू पंख नवे… आम्हाला बालभवन हवे...

१९७९ हे वर्ष आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून जाहीर झालं होतं. पालक-शिक्षक संघानं इतर काही संस्थांना एकत्र करून शनिवारवाड्यावर मोठा कार्यक्रम केला. बालकांच्या गरजा त्यातून मांडल्या होत्या. श्रीमती शांताबाई किर्लोस्करांनी एक गाणं लिहिलं होतं –
जागवा जागवा, सकल विश्व जागवा
बालकांस अग्रहक्क, हाच मंत्र गाजवा
शरीर बनो सुदृढ सबल, सदय मने हात कुशल
या जगती शांती, बुध्दी, मैत्री, प्रेम जागवा
अशी त्याची पहिली दोन कडवी होती.

असू दे, असू दे, बालभवन असू दे !

१९७९ साल हे आंतरराष्ट्रीय बालकवर्ष म्हणून जगभर साजरं केलं गेलं. पुण्यातही त्यावेळी खूप उपक्रम झाले. पण तेवढ्यापुरते उपक्रम होऊन तिथेच थांबू नयेत तर मुलांसाठी नियमितपणे काम चालावं अशी कल्पना पुढे आली. गरवारे बालभवनचा जन्म या संकल्पनेतून झाला आणि १ सप्टेंबर १९८५ रोजी ते बाळ संचालिका शोभा भागवत यांच्या ओटीत आलं. शोभाताईंनी अतिशय सक्षमपणे, संवेदनशीलतेनं व सर्जनशीलतेनं आजवर सांभाळलं. त्याचा नावलौकिक केवळ पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला. या कार्याला (१) आदिशक्ती पुरस्कार-पुणे; (२) डॉ.

बालभवनात बहरताना...

बालभवन हे मुलांसाठीचं हक्काचं स्थान ! इथल्या वातावरणामुळे, उपक्रमांमुळे मुलांमधील सुप्त गुणांना फुलायची संधी मिळते. १९८८मध्ये बालभवनच्या प्रशिक्षणानंतर मला जाणवलं की आपल्याला मुलांमध्येच काम करायचं आहे. बालभवनचं मोकळ्या उत्साहानं भरलेलं वातावरण आणि परस्परांमधला आपलेपणाचा व्यवहार बघून तर मी बालभवनचीच झाले.

समाजाच्या आरोग्यासाठी बालभवन

मी खेळू कुठं? मी नाचू, गाऊ कुठं?
मी कुणाशी बोलू?
बडबड केली की आई रागावते,
खेळायला लागलो की बाबा चिडतात,
जरा उड्या मारल्या तर ‘एका जागी बस बरं’ म्हणतात,
गाणं म्हणलं तर गुरकावतात ‘गप्प बस’.
मी जाऊ तरी कुठं आणि करू तरी काय?
... गिजुभाई बधेका (बालदर्शनमधून)

गाज बालभवनाची

आधी खेळायला मग ताई म्हणून शिकवायला आणि आता पालक म्हणून असं विविध टप्प्यांवर बालभवन अगदी जवळून बघितलं, अनुभवलं. उद्घाटन समारंभापासूनची दृश्यं आजही जशीच्या तशी आठवतात. एवढ्या मोठ्या संस्थेची जबाबदारी आपली आई घेणार, यातून दहाव्या वर्षी वाटलेला अभिमान आणि आपली आई आपल्यापासून दूर तर जाणार नाही ना अशी वाटलेली अस्वस्थता हे दोन्ही अनुभवल्याचं आठवतं. मुलांना मोकळीक देणं म्हणजे काय असतं हे मला कधी पुस्तकात वाचावं लागलं नाही कारण स्वतः मूल असल्यापासून मिळणाऱ्या वागणुकीतून ते मी अनुभवलं. बालभवनमुळे फक्त स्वतःची मोकळीक नाही तर आजूबाजूच्या सर्वांना मिळणारी मोकळीक महत्त्वाची असल्याचं समजलं.

बालभवन: बालकारणाचे पहिले पाऊल

‘बालकारण’ हा शब्द ताराबाई मोडक यांनी त्यांच्या कामाकडे लक्ष वेधताना आणि बालशिक्षणाविषयी जागृतीची चळवळ उभारताना वापरला, आणि आता बालह्क्काच्या सर्व प्रयत्नांना तो कवेत घेत आहे. बालविकास, बालरंजन, बालसाहित्य यांकडे प्रौढांनी एक जबाबदारी म्हणून बघायला पाहिजे, ही जाणीव गेल्या शतकात झालेल्या अनेक बदलांची परिणती आहे. औद्योगिक प्रगती, महानगरी समाज आणि आक्रसत गेलेला कुटुंबाचा आकार या सर्व गोष्टींचे परिणाम लक्षात येऊ लागल्यावर मुलांच्या खुरटणार्या विश्वाची बोच निर्माण झाली.