News not found!
१९९६ साली संजीवनी बरोबर आणखी सहा जणांनी एकत्र येऊन " पालकनीती परिवार " या संस्थेची स्थापना केली .पूर्वी आर्कीटेकट म्हणून व्यवसाय करणाऱ्या शुभदा जोशी ह्या संस्थेच्या विश्वास्तांपैकी एक आहेत . १९९४ पासून त्या पालकनीती मासिकाच्या कामाशी जोडल्या गेल्या . या कामातून सभोवतालच्या परिस्थितीकडे संवेदनक्षमतेने बघायची सुरुवात झाली होती . शुभदा जोशीच्या घराजवळच "लक्ष्मीनगर" ही बांधकाम कामगारांची झोपडवस्ती वसली आहे. ही वस्ती डोंगरउतारावर असल्यान सरकारमान्य होऊ शकत नाही. इथे आगदी छोट्या - छोट्या पत्र्याच्या झोप्द्यातून माणस- मुल राहतात .वीज -पाणी-संडास इतक्या मुलभूत सुविधाही त्यांना अभावानेच मिळतात.
आई -वडील दोघंही दिवस -दिवस कामानिमित्त बाहेर असतात. मुल घरात एकटीच .मग लहानांना सांभाळण्यासाठी मोठ्यांना शाळा राहून जातात. शाळेत घातली तरी आणा -पोचवायला पालकांना वेळ नसतो,जरुरीच्या वस्तू विकत आणयला पैसा नसतो, मुल शाळेत जातात ना,ह्याकडे लक्ष देण शक्यच नसते. खेरीज शाळांतल्या दमदातीच्या वातावरणात मुल रमत नाहीत. ह्या सगळ्या कारणांनी मुल शिक्षणापासून वंचित राहतात. आजूबाजूला दारू, भांडण- मारामाऱ्या- -शिवीगाळ -टगेगिरी-जुगार यासारख्या गोष्टीनी भारलेल जग. या वातावरणाचे मुलांवर निश्चितच वाईट परिणाम होतात.त्यांची काहीच चूक नाही, तरी हि मुल तिथ आहेत,दारिद्र्याशी झुंजताहेत, कष्ट्ताहेत.याच कारण केवळ त्याचं नशीब किवा प्रयत्नांचा अभाव एवढाच नाही. याचं मुख्य कारण आहे पशाकडे पैसा नेण्यार्या आजच्या भ्रष्ट व्यवस्थेमध्ये .ही व्यवस्था जरी आपण बनवली नसली तरी यातली विषमता आपल्याला अस्वस्थ बनवते .एकीकडे जन्माने वरच्या मानल्या गेलेल्या जातीत -वर्गात मिळालेल्या स्थानामुळे या व्यवस्थेचे अनेक फायदेही आपसुख आपल्या पदरात पडतात. त्यामुळे ज्यांना हे फायदे मिळत नाहीत त्याच्यासाठी आपणच काहीतरी करायला हव अस आम्हाला तीव्रतेन वाटल, पालकनीती मासिकाच्या माध्यमातून मुलांच्या हक्कांबद्दल , बाल्मानसाबद्दल ,शिक्षणासंद्र्भातल्या संशोधनाबद्दल सातत्यान विचार होत होता त्यामुळे कामाची दिशा स्पष्ठ होत गेली.
यातूनच १९९६ मध्ये शुभदा जोशी यांच्या राहत्या घरात लक्ष्मीनगर मधल्या मुलांच्यासमवेत संस्थेच 'खेळघर' सुरु झाले .काम करता करता या मुला -मुलींचं वास्तव ,अडचणी समजावून घेण शक्य झाल.त्यांना शिकण्याची गोडी लागावी, शिकण्यासाठीच्या विविध क्षम्ताचा विकास व्हावा ,याशी काय करायला हव नि काय अजिबात करायला नको या बाबतीत आमचे विचार स्पष्ठ होऊ लागले.
हळूहळू समविचारी व्यक्तींचा जट जमू लागला आणि अनेक पातळ्यांवर कामाची सुरुवात झाली.खेल्घारत्या मुलांची संख्या वाढली .१९९८ साली लक्ष्मिनगर्मध्ये पालकांच्या मदतीने एका पत्र्याच्या शेडमध्ये 'आंनद्सकुल ' सुरु झाले. मुलांना शिकण्यातला आनद समजावा म्हणून वयोगटाप्रमाणे खेळघर, अभ्यासवर्ग , संवादवर्ग ,सहली,शिबीर असे अनेक उपक्रम सुरु झाले. २००३ मध्ये शुभदा जोशींच्या घराशेजारी ऐका स्वतंत्र सदनिकेत खेलघरच स्थलांतर झाल .मुलांना खेळायला ,वाचायला,अभ्यासाला स्वतंत्र जागा मिळाली. आता या कमी नौ पूर्णवेळ व दहा अर्धवेळ कार्यकत्यांचा सहभाग आहे.
इतक्या वर्षाच्या या कामानंतर आता खेळघर च्या कामातून आम्हाला काय साधायचे आहे याची काहींशी स्पष्टता आली आहे.
नेमक्या या टप्प्यावर ‘सर रतन टाटा ट्रस्ट’ या संस्थेच्या निधीची (फंडिंगची) मुदत संपली. एका बाजूला खर्च वाढून बसलेले नि दुसरीकडे अपुरा निधी. वेगवेगळ्या फंडिंग एजन्सीजकडे, कॉर्पोरेटस्कडे निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. २००६ साल या प्रयत्नात गेलं. जवळची पुंजी संपत चालली होती. आहे ते काम चालू ठेवण्यासाठी निधी अत्यंत आवश्यक होता. पण त्याबरोबरच हे काम आणखी पुढे नेण्याच्या अनेक दिशाही खुणावत होत्या.
लक्ष्मीनगरमधल्या फक्त ऐंशी मुलांपर्यंत पोचणं पुरेसं नव्हतं. या कामातून जमा झालेल्या अनुभवाच्या पुंजीच्या जोरावर खेळघरासारखी आणखी कामं सुरू करू शकू असा आत्मविश्वास वाटत होता. तसंच याच वस्तीतल्या शालाबाह्य मुलांबरोबर काम करायची निकडही जाणवत होती. खेळघरातल्या दहावी पास झालेल्या मुलांना सोडून द्यायला जीव धजावत नव्हता.
या संदर्भात सर रतन टाटा ट्रस्टशी पुन्हा साकल्यानं बोलणं केलं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे, या सार्या नव्या आव्हानांसह आधीच्या कामासाठीचाही आर्थिक भार उचलण्याची ट्रस्टने जबाबदारी घेतली. एवढेच नव्हे तर वेळोवेळी त्यांच्याबरोबर होणार्या चर्चांमधून प्रोत्साहन तर मिळालंच त्याबरोबर मार्गदर्शनही मिळालं.