News not found!
खेळघरातली विशेषतः लहान मुलं आणि मुली ऍनिमिक असतात. त्याचा त्यांच्या बौद्धिक विकासावर व शारिरिक विकासावर विपरीत परिणाम होतो. खेरीज अनेकदा शाळेतून परस्पर मुलं खेळघरात येतात. त्यांना भूक लागलेली असते त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही.
आहारासंदर्भात मुलांची संपूर्ण गरज भागवणे तर आम्हाला शक्य नाही पण काही किमान तर करता येईल या उद्देशाने आठवड्यातून २ किंवा ३ वेळा मुलांना पौष्टिक खाऊ देण्याचे ठरवले. अनेकदा मुलं मिळूनच हा खाऊ खेळघरात तयार करतात. खेळघराचे काही हितचिंतक यासाठी नियमित देणगी देतात.